ब्रेकिंग.. ठाकरे गटाची याचिका हायकोर्टाने फेटाळली

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. हायकोर्टाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली आहे. पक्षचिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. शिवसेनेच्या ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. त्याशिवाय निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाचा निर्णय तातडीनं घेण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.

उद्धव ठाकरे गटानं धनुष्यबाणासाठी दिल्लीतील हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र आज कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. अंधेरी पोट निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगानं धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव गोठवलं होतं. त्यानंतर शिंदे गटाला आणि उद्धव ठाकरे गटाला नवीन चिन्ह आणि नाव तात्पुरतं दिलं होतं. पण ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णायाविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली आहे, त्याशिवाय पक्षचिन्हाचा निर्णय तातडीने घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत.

याचिकामध्ये काय आहे ?

8 ऑक्टोबर रोजी हायकोर्टानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं होतं. निवडणूक आयोगानं हा निर्णय घाईमध्ये घेतल्याचं सांगत ठाकरे गटानं हायकोर्टात धाव घेतली होती. नियमांचं पालन झालेलं नाही, असाही आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. ज्या कारणासाठी धनुष्यबाण गोठवलं होतं, ते कारण आता राहिलेलं नाही. त्यामुळे आता स्थिती पूर्वरत करावी, असे याचिकामध्ये म्हटलं होतं. आयोगानं पक्षचिन्ह गोठवतांना आमची बाजू ऐकली नाही.

 काय म्हटलं हायकोर्टानं?

निवडणूक आयोगाचा अधिकार मान्य करत दिल्ली हायकोर्टानं शिवसेनेची याचिका फेटाळली आहे. त्याशिवाय चिन्हाचा अंतिम निर्णय तातडीने घ्यावा, असे आदेश निवडणूक आयोगाला हायकोर्टानं दिले आहेत. पक्षचिन्हाच्या निर्णायाचे अधिकार हे निवडणूक आयोगालाच आहेत, त्यामध्ये कोर्ट पडत नाही. त्यामुळेच पक्षचिन्हाचा अंतिम निर्णय होईपर्यंत धनुष्यबाण गोठवलेलंच असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.