लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊनही भुजबळांची नवी खेळी ?

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात बहुचर्चित अशा नाशिक मतदारसंघातून महायुतीत नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याचीच चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती. त्यातच छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे ही जागा नेमकी कोणाकडे जाणार यासाठी तर्क लावले जात असतानाच आता या मतदारसंघाने पुन्हा एकदा संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी माघार घेतली असली तरीही त्यांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी अर्ज घेतल्याने खळबळ उडालीय. दिलीप खैरेंचे बंधू अंबादास खैरे यांनी त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. छगन भुजबळ यांना मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो असे भाजपला वाटते, त्यामुळे भुजबळांनी माघार घेतली असली तरी त्यांच्याच गोटातील उमेदवार दिला जाणार ही बाब इथे समोर येत आहे. एका बाजूला शिंदे गटातून हेमंत गोडसे, अजय बोरस्ते तर भाजपकडून स्वामी शांतिगिरी महाराज येथील जागेसाठी बाशिंग बांधून बसलेले असतानाच दुसरीकडे दिलीप खैरे यांनी अर्ज घेतल्याने भुजबळांच्या राजकीय खेळीची चर्चा सध्या जोरात सुरु आहे.

व्यक्त केली नव्हती. पण, ही नवी खेळी समोर आल्यामुळे आता नेमके राजकीय समीकरण कसे असेल याचीच राजकीय चर्चा आता नाशिकमध्ये सुरु आहे. नाशिकमध्ये भुजबळांच्या नावासाठी असणारा नकारात्मक सूर पाहता, एकूणच महायुतीत आलबेल नसल्याचे चित्र समोर आले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठीसुद्धा ते नाशिकबाहेर पडले नसून, नाशिक मतदारसंघातूनच ते सुत्र चावलत असल्याचे म्हटले जात आहे. अनेकांनी हा डमी अर्ज घेण्यात आला असून, खुद्द भुजबळच या जागेवर उभे राहू शकतात अशीही दाट शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नाशिक मतदार संघावर राष्ट्रवादीचाच दावा राहतो का, यावर आता सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.