औरंगाबादमध्ये लग्नात आलेल्या पाहुण्यांना विषबाधा

0

औरंगाबाद,लोकशाही न्युज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात 500 हून अधिक लोकांना विषबाधा (foodpoisoning) झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत (Aurangabad) उघडकीस आली आहे. या सर्वांना औरंगाबादच्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, दरम्यान काही रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाचा काल रात्री लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना विषबाधा झाली आहे . सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसून, प्रकृती स्थिर असल्याने बहुतांश रुग्णांना रात्रीच डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाचा काल 4 जानेवारी रोजी मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्यात पाहुण्यांनी जेवण केल्यानंतर काही वेळातच त्यांना अपचनाचा त्रास सुरु झाला त्यामुळे जवळच असलेल्या एमजीएम (MGM Medical College and Hospital) व घाटी रुग्णालयात (Ghati Hospital) दाखल करण्यात आले. हा प्रकार जेवणातील विषबाधेमुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून वर्तविण्यात आला आहे.जेवणानंतर सर्वांनी गोड पदार्थाचे सेवन केले होते. हा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळेतच पाहुण्यांना उलट्या व मळमळीचा त्रास जाणवू लागला. काही पाहुणे स्वतःहून रुग्णालयात दाखल झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.