निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा; उद्धव ठाकरे

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

ठाकरे आणि शिंदे गटातला वाद संपण्याऐवजी अजून वाढत चालला आहे. कारण काय तर धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाले. राज्यातील ठाकरे गटाच्या प्रमुखांची आज महत्वाची बैठक पार पडली. संघटनात्मक बांधणीसाठी ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक सेनाभवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जिल्हाप्रमुखांना महत्वाच्या सुचना दिल्या. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेसाठीचा संघर्ष सुरू आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे यांच्यातला हा वाद सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाकडे गेला. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“तुम्ही माझ्याकडे का आलात कारण माझे नाव देखील चोरले आणि चिन्ह देखील चोरले आहे. हा पूर्वनियोजीत कट होता. हे असचं सुरू राहीलं तर येणारी लोकसभा निवडणूक शेवटची असले. त्यानंतर देशात हुकूमशाही नांदेल”निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय घेतला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर देखील प्रश्न उपस्थित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.