Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • धान, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी प्रशिक्षण
    • ‘मार्क इकॉनॉमी’ ते ‘मस्क इकॉनॉमी’
    • वांगचुक यांच्या आंदोलनाने देशाला काय विचारायला भाग पाडले?
    • तब्बल २३.७४ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश
    • कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच पक्षाचे अस्तित्व!
    • राज्यातील ‘एसआयआर’ला ‘इतक्या’ दिवसांची मुदतवाढ
    • बापरे! भरधाव ट्रेनने शाळेच्या व्हॅनला उडवले
    • सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा एकोणिसावा दिवस
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»कृषी»जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीआधी केळी पीक विमा रक्कम मिळणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
    कृषी

    जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीआधी केळी पीक विमा रक्कम मिळणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 3, 2023Updated:November 3, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

     

    केळी पीक विम्याची प्रलंबित मदत व या वर्षातील खरीप हंगामी पिकविमा अंतर्गत २७ महसूल मंडळातील २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची ग्वाही विमा कंपनीने दिली आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

    राज्य शासनाने  पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२२-२३ साठी राज्य हिस्स्याची १९६ कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी मंजुरी देवून निधी वितरित केला होता. यामुळे जिल्ह्यातील रखडलेला पिक विमा नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होवून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा शासनाचा निर्धार आहे.

    तसेच जिल्हयातील खरीप हंगामी सन २०२३-२४ पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत ज्या महसूल मंडळामध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडला होता, अशा सुमारे २७ महसूल मंडळातील शेतकरी हे पिक विमा निकषाप्रमाणे जिल्हा प्रशासनाने अधिसूचित करून भरपाईसाठी पात्र ठरवले होते. पात्र महसूल मंडळातील विमा धारक शेतक-यांना विम्याच्या निकषाप्रमाणे २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई देय असून ती तात्काळ देण्याबाबत कार्यवाही करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे असे निर्देश दिलेले असल्याची माहिती पालकमंत्री श्री.पाटील यांनी दिले आहेत.

    राज्याच्या कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे जिल्ह्यासाठी सरसकट लाभ देण्यासाठी सतत पाठपुरावा केला आहे. त्यामुळे सदर नुकसान भरपाई रक्कम ही ४ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. अशी ग्वाही पालकमंत्र्यांना विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी दिले आहे. तापी महामंडळ येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शेतकरी तक्रार निवारण व पीकविमा समितीचे सीए. हितेश आगीवाल व अधिकारी उपस्थित होते.

    #jimaka #krishi farmer jalgaon Pik Vima
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    धान, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी प्रशिक्षण

    July 17, 2026

    तब्बल २३.७४ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश

    July 17, 2026

    कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच पक्षाचे अस्तित्व!

    July 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif