Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री बदलाचे वारे !
    जळगाव

    जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री बदलाचे वारे !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 4, 2023Updated:July 4, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- राज्यात नुकतीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकारमध्ये सामील झाल्याने आता शिंदे – फडणवीस सरकारची यामुळे आणखी ताकद वाढली आहे. शिंदे सरकारमध्ये राष्ट्रवादीकडून अमळनेरचे आमद्रयें अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच त्यांची प्रतोद पदी निवड करण्यात आली आहे.

    त्यामुळे या रूपाने अनिल पाटील यांना एक महत्वाचे पद मिळाले असून ते अजित पवार यांचे निष्ठावान समजले जातात. त्यामुळे त्यांची वर्णी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्याला तीन पक्षाचे तीन बलाढ्य मंत्री मिळाले आहेत . भाजपचे गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू व्यक्ती म्हणून मानले जातात. त्यांच्याकडे ग्राम विकास आणि वैद्यकीय शिक्षण सारखे महत्वाचे खाते आहे . तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खांदेसमर्थक मानले जातात. त्यांच्याकडेही पाणीपुरवठा आणि जळगाव तसेच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. तर आता नव्याने मंत्रिपद मिळालेले अनिल भाईदास पाटील हे पूर्वाश्रमीचे भाजपचे असले तरी ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले एकमेव मंत्री आहेत.

    एककेकाळी जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार सर्वाधिक असताना आता केवळ एक आमदार अनिल पाटील यांच्या रूपाने आहे. राष्ट्रवादीला आलेली जिल्ह्यातील मरगळ दूर करण्यासाठी आणि जिल्ह्यात राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी अनिल पाटील यांना जळगाव जिल्ह्याचे मंत्रिपद मिळावे अशी अपेक्षा आता होऊ लागली आहे . तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे एकाचवेळी तीन जिल्ह्याचे यात धुळे,लातूर आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे. ते अनुभवी आणि कार्यकुशल मंत्री असल्याने त्यांच्याकडेही जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपवावे अशी अपेक्षा जनसामान्यातून होत आहे. जिल्ह्याचा विकास पाहिजे त्या प्रमाणात न झाल्याने लोकांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. जळगाव शहरातील रस्ते , जिल्ह्यात रखडलेले सिंचन प्रकल्प , इतर विकास कामे यांना निधी प्राप्त झाल्याचे अथवा निधी मिळवून देण्याचे म्हटले जाते . मात्र पहिजे त्या प्रमाणात या प्रकल्पना गती प्राप्त होत नाही.

    केवळ आश्वासन आणि घोषणांचा पाऊस पाडून ती कामे वेळेच्या आत होणे अपेक्षित असताना केवळ रखडली गेली असल्याची भावना जनमानसात दिसून येत आहे. तर दुसरीकडे मंत्री पदाचा अनुभव नसलेले अनिल भाईदास पाटील यांना पालकमंत्री पद दिल्यास त्यांच्या तालुक्यातील रखडलेला पाडळसरे सिंचन प्रकल्प ते प्राधान्याने सोडवतील असेही म्हटले जात आहे. त्यामुळे अनिलदादा अजित दादांकडे आग्रह धरून जिल्ह्याचे पालकमंत्रिपद पदरी पाडण्याची शक्यता निर्माण झाल्याने पालकमंत्री पदाच्या बदलीचे वारे वाहू लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

     

     

     

     

     

     

     

    #bjp #shivsena ajit pawar Anil Patil Devendra Fadnvis Eknath shinde girish mahajn Gulabrao Patil jalgaon Rashtravadi
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026

    व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

    May 18, 2026

    पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif