चाळीसगाव हादरले;क्रिकेटच्या वादातून मुंबई पोलिसाचा तलवारीने सपासप वार करून निर्घृण खून

0

चाळीसगाव;-मुंबई पोलीस दलात कर्मचारी असलेल्या तरूणाचा क्रिकेट स्पर्धेच्या झालेल्या वादातून धारदार तलवारीने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील पीर मुसा कादरी दर्गा परिसरात रविवारी १४ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला आहे. या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांनी चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.. शुभम अर्जुन आगोणे (वय-२८ रा. चाळीसगाव) असे मयत पोलिस तरूणाचे नाव आहे.

 

चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथे रविवारी सकाळी क्रिकेटचे सामने झाले. या सामन्यावेळी एका गटासोबत शुभम आगोणे याचा वाद झाला होता व त्यानंतर रविवारी सायंकाळी हा वाद उफाळून आला.

यात चार जणांनी शुभमवर तलवारीने सपासप वार करून गंभीर जखमी केले. ही घटना पाटणादेवी रोडवरील बामोशी बाबा दर्ग्याजवळ घडली. यात रक्तांच्या थारोळ्यात पडलेल्या शुभमला काही नागरीकांनी तातडीने खासगी वाहनातून शहरातील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. यावेळी डॉ. देवरे यांनी मयत घोषीत केले.घटना कळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

चाळीसगाव शहरात खूनाची घटना घडल्यानंतर चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील व सहकार्‍यांनी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केल्यानंतर शहर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविल्यानंतर चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.