दिल्लीत बसलेल्या दोघांकडून मुंबईचे महत्त्व कमी -उद्धव ठाकरे

0

मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे नाव न घेतादि दिल्लीत बसलेल्या दोघांकडून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. आपली लढाई ही पंतप्रधान मोदींशी नाही तर हुकूमशाहीविरोधात असल्याचाही टीका त्यांनी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी माणसाला मान, सन्मान मिळवून दिला तो तुम्ही सर्व शिवसैनिकांनी. मराठी माणसाला मुंबई ही काय आंदन मिळाली नाही. मुंबईसाठी बलिदान करावे लागले होते. आपली मुंबई ही दोन जण दिल्लीत बसलेत त्यांच्या चरणावर वाहून टाकत आहात आणि ज्यांना गादीवर मारून मुटकून बसवले आहे.त्यांना पण कळत नाही की, त्यांचा वापर केला जात आहे. त्यांच्या कपाळावरचा शिक्का काही सात पिढ्यात जाणार नाही.

उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्या मुंबईची विलेव्हाट लागते. मुंबईला लाचार केले जात आहे. हे आपण कसे काय सहन करू शकतो. आपण काय मोदींविरोधात लढत नाही तर हुकूमशाहीविरोधात लढत आहोत. मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी होती, असे आपण अभिमानाने सांगत होतो. आता मुंबईचे हे स्थान राहिले की नाही याचा शोध घ्यावा लागेल. आज हे दोघे जण वरती म्हणजे शिवाजी मंदिरात नाही, तर दिल्लीत बसलेले हे सर्व जण ओरबाडून काढत आहेत, असा शब्दांत त्यांनी टोला लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.