जिल्ह्यात विविध ठिकाणांहून ६ तरुणी बेपत्ता

0

जळगाव ;- जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १८ ते १९ वर्ष वयोगटातील ६ तरुणी हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

अमळनेर शहातील एका परिसरात राहणारी १८ वर्षीय तरुणी १८ रोजी सकाळी कॉलेजला पेपर असल्याचे सांगून निघून गेली. मात्र ती घरी परत न आल्याने तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

दुसर्या घटनेत भुसावळ तालुक्यातून १८ वर्षीय तरुणी एका गावातून कोणालाही न सांगता घरातून १९ रोजी सकाळी ४ वाजेपूर्वी निघून गेली. तिचा शोध घेऊनही ती आढळून न आल्याने तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून १९ रोजी दुपारी २ वाजता भुसावळ तालुका पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

तिसर्या घटनेत बोदवड तालुक्यातील एका गावातून १८ वर्षांची तरुणी टायपिंग क्लासला जाते असे सांगून १८ रोजी सकाळी १० वाजता निघून गेली . याबाबत बोदवड पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

चौथ्या घटनेत जळगावत तालुक्यातील एका गावातून १९ वर्षीय तरुणी मोठी बहीणकडे पाचोरा येथे असे सांगून १८ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घरून निघून गेली. मात्र ती पाचोरा येथील बहिणीकडे पोहचली नसल्याने तिचा इत्ररत्र नातेवाईंकांडॆ शोध घेतला असता मिळून न आल्याने तिच्या वडिलांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला धाव घेऊन तक्रार दिल्यावरून हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

पाचव्या घटनेत भडगाव तालुक्यातील एका गावातील रहिवाशी असलेली २२ वर्षीय तरुणी हि चाळीसगाव शहरातील आपल्या बहिणीकडे आली होती. त्यावेळी तिने चप्पल शिवून आणते असे सांगून भडगाव रोड येथून १९ रोजी सकाळी ११ वाजता निघून गेली. मात्र ती घरी न आल्याने तिच्या बहिणीच्या पतिने दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

सहाव्या घटनेत रामानंद नांगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून १८ वर्षीय तरुणी १९ रोजी ३ वाजेच्या सुमारास कॉलेजला जाऊन येते असे सांगून निघून गेली . तिचा शोध घेऊनही ती मिळून आली नाही. याबाबत रामानंद नगर पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.