राज्‍यपालांच्‍या आदेशाविराेधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रातील राजकारणास वेगळेच वळण लागले आहे. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी बहुमत चाचणी करण्याचे आदेश देताच शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

१६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असताना राज्यपालांनी बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत, ते अवैध आहेत. तसेच या बहुमत चाचणीसाठी केवळ एक दिवसाचा वेळ दिला आहे. हा वेळ अपुरा आहे. सर्व आमदारांना पोचण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात, असे प्रभू यांनी याचिकेत म्हटले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती शिवसेनेचे वकील मनू सिंघवी यांनी न्यायालयाकडे केली आहे. शिवसेनेच्या याचिकावर ५ वाजता सुनावणी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.