मुंबई ;- भाजपाला चार राज्यांच्या निकालांमध्ये तीन राज्यांमध्ये तीन राज्यांमध्ये अभूतपूर्व यश मिळालं आहे. हे यश जनतेचा मोदींवरचा विश्वास. जनतेने मोदींवर जो विश्वास दाखवला त्याचंच आहे. पंतप्रधान मोदींनी ज्या प्रकारे गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला. सामान्य माणसाच्या मनात हे बिंबवलं आहे की सरकार त्यांच्यासाठी काम करतं आहे. त्याचं प्रत्यंतर लोकांना पाहण्यास मिळालं हा त्याचा विजय आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पनवती कोण आहे ते आता काँग्रेसला कळलं असेल अशी टीका त्यांनी यावेळी केली.
या विजयाचं श्रेय खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे. तसंच आमचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह जी भाजपाची टीम आहे त्या सगळ्यांचं श्रेय आहे. या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. एवढंच नाही तर आता पनवती कोण आहे हे काँग्रेसला कळलं असेल. निवडणूक निकालात ते दिसून आलं आहे. त्यामुळे आता राहुल गांधी किंवा काँग्रेसचे लोक आता पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत असे शब्द वापरणार नाहीत याची मला खात्री आहे. आम्हाला यश मिळालं की ते ईडी, सीबीआयने दिलेलं यश आहे म्हणायचं आणि त्यांना यश मिळालं की जनतेचा कौल म्हणायचं. या मानसिकतेत जोपर्यंत विरोधक असतील तोपर्यंत ते सत्तेत येणार नाहीत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.