Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»आम आदमी पार्टीचे कार्यालय अतिक्रमित जागेवर; १५ जूनपर्यंत खाली करा, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
    राजकारण

    आम आदमी पार्टीचे कार्यालय अतिक्रमित जागेवर; १५ जूनपर्यंत खाली करा, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 4, 2024Updated:March 4, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

     

    आम आदमी पक्षाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अनेक नेते तुरुंगात गेल्यानंतर आता पक्षाला मध्यवर्ती कार्यालय रिकामे करावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना पक्षाला कार्यालय रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने सांगितले की, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने १५ जूनपर्यंत वेळ देण्यात आली आहे.

    दिल्ली उच्च न्यायालयाला दिलेल्या जमिनीवर हे अतिक्रमण आहे

    हा आदेश देताना न्यायालयाने म्हटले आहे की, हे दिल्ली उच्च न्यायालयाला दिलेल्या जमिनीवरील अतिक्रमण आहे. या जमिनीचा उद्देश राऊस ॲव्हेन्यू कोर्टासाठी अतिरिक्त कोर्टरूम बांधणे आहे. आम आदमी पक्षातर्फे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, ही जमीन 2015 मध्ये ‘आप’ला देण्यात आली होती. हा पक्ष देशातील सहा राष्ट्रीय पक्षांपैकी एक असून त्याला भूखंडाची गरज आहे.

    AAP नवीन कार्यालयासाठी सरकारकडे अर्ज करू शकते

    यावर सुप्रीम कोर्टाने सांगितले की, आप नवीन कार्यालयासाठी सरकारकडे अर्ज करू शकते. ‘आप’च्या अर्जावर संबंधित विभागाने ४ आठवड्यांत निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणी १४ फेब्रुवारीला सुनावणीही झाली होती. यादरम्यान सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त करत याबाबत कायदे मोडीत काढले जात असून ते कोणालाही परवानगी देऊ शकत नाही, असे म्हटले होते.

    केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली – आप

    दिल्ली उच्च न्यायालयाला दिलेल्या राऊस एव्हेन्यूच्या भूखंडावर आपचे कार्यालय सुरू आहे, अशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. आधी दिल्लीच्या परिवहन मंत्र्यांचे निवासस्थान होते, पण नंतर ‘आप’ने आपले कार्यालय येथे केले. या प्रकरणी आम आदमी पक्षाने केंद्र सरकारने न्यायालयाची दिशाभूल केल्याचे म्हटले आहे. येथे कोणतेही अतिक्रमण झालेले नाही. ही जमीन “आप” ला दिल्ली सरकारने दिली आहे.

    Aam Aadmi Party AAP Chief Minister Arvind Kejriwal New Delhi Supreme Court
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक

    June 11, 2026

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026

    पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif