विहिरीत पडल्याने तरूण शेतकर्‍याचा मृत्यू…

0

 

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

विहिरीचे काम करणार्‍या शेतकर्‍याचा अचानक तोल जाऊन विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, गिरधर खिलचंद नेहते (३४) रा. न्हावी तालुका यावल हे दि. ५ मे रोजी न्हावी येथे आपल्या शेतात काम करीत होते. याप्रसंगी तोल जाऊन तो विहीरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत फैजपूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत तरुणाच्या मृतदेहाला बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेले. याप्रकरणी फैजपूर पो.स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात वयोवृद्ध आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. पुढील तपास फैजपूरच्या सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेश बर्‍हाटे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.