पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
तालुक्यातील टोळी येथील वृद्ध महिलेचा विहिरीत तोल गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, टोळी येथील मैनाबाई आत्माराम पाटील (८०) या दि. १७ रोजी गावालगत असलेल्या वाघ्रेश्वरी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जात होत्या दरम्यान त्या विहीरी जवळून जात असताना त्यांचा पाय घसरून तोल जावून विहिरीत पडल्या. यानंतर त्यांना तातडीने पारोळा येथील कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या बाबत पारोळा पोलिस स्टेशनला सतिष धोंडू पाटील रा. टोळी यांच्या माहिती वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहे.