मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
यावेळी ते म्हणाले की, ‘धनुष्यबाण हा आमचाच आहे तो आमच्यापासून कोणीही हिरावून घेवू शकत नाही’. यापूर्वी त्यांनी असे म्हटले होते की, कोणतेही चिन्ह आले तरी ते घराघरापर्यंत घेऊन जा. या त्यांच्या विधानावर त्यांनी आज स्पष्टीकरण केले.
उध्दव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मनातील खंत बोलून दाखवली. बंडखोरीबाबत मलाही वाईट वाटत आहे. मला कुठेही वाद विवाद होऊ द्यायचा नाही. आमच्यावर विकृत टीका करणाऱ्यांवर बोलताना दातखिळी बसली होती का? त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता, मत प्रेम खरं की खोटं? असे अनेक सवाल बंडखोरांना ठाकरेंनी केले.