स्मशानभूमीतच एकाने गळफास घेत संपविले जीवन

0

शिरसोली येथील दुर्दैवी घटना ; गावात हळहळ

जळगाव ;-माणसाचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याला स्मशानात आणून विधिवत अंत्यसंस्कार करण्यात येते . मात्र एकाने स्मशानभूमीतच गळफास घेऊन स्वताचे जीवन संपविल्याची धक्कदायक तितकीच दुर्दैवी घटना गुरुवारी २९ जून रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास शिरसोली येथे उघडकीस आली असून या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

संजय हरी पाटील (वय ४०, रा. शिरसोली प्र. बो. ता.जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. संजय पाटील हे व्यवसायाने ट्रक चालक होते. संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान त्याने पत्नी व भावांना शिर्डी येथे दर्शनासाठी जात असल्याचे सांगितले. मात्र शिर्डीला न जाता शिरसोली गावातील स्मशानभूमीच्या शेडमध्ये ते आले.या ठिकाणी शर्टच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

गळफास घेतल्याचा प्रकार गावातील गोलू पवार यांच्या लक्षात आली. त्यांनी घटनेची माहिती पोलीस पाटील शरद पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. मयत संजय हरी पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी आई-वडील व तीन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.