मुंबई ;- मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यात होणाऱ्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू चालणार नाही. असा दावा आज संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला .
संजय राऊत म्हणाले, छत्तीसगड, मध्य प्रदेशात भाजपाचा पराभव होत आहे. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत ‘जादूगर’ आहेत. गेहलोतांनी देशाच्या पंतप्रधानांना आव्हान दिलं आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस बाजी मारणार आहे. “तेलंगणात भाजपा स्पर्धेत नाही. भाजपाने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून के. चंद्रशेखर राव आणि एमआयएमला मतदान करण्यासाठी मतदारांना संदेश दिला आहे. पण, काँग्रेसला मतदान करू नये, असंही सांगण्यात आलं आहे. तेलंगणात भाजपाने ही रणनिती आखली आहे. मात्र, तेलंगणात काँग्रेसने मुसंडी मारली असून चांगला निकाल समोर येऊ शकतो.दरम्यान भाजपा विकासाच्या कामावर मते का मागत नाही? प्रभू श्री रामाचे दर्शन मोफत दाखवण्यापेक्षा काश्मीरी पंडितांची घरवापसी केली असती, तर नक्कीच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मागण्याचा अधिकार भाजपाला होता. २०१४ पासून काश्मीरी पंडितांच्या मुद्दयावरून भाजपा मते मागत आहे. अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.