मागण्या मान्य झाल्या पण आरक्षण बाकी ; राज ठाकरे यांचे एक्सद्वारे जरंगे पाटलांचे अभिनंदन

0

मुंबई ;- मराठा समाजसच्या आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या आज मुख्यमंत्र्यानी मान्य केल्याने मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुटले आहेमात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही या विषयावर भाष्य केले आहे. एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकून राज ठाकरेंनी मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन व्यक्त केले. मात्र त्यासोबतच मागण्या मान्य झाल्या, आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे असं सांगत राज ठाकरेंनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण केले.

राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठा बांधवांना, भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल. लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा असं सूचक विधान त्यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.