जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील (Maharashtra) तापमानात सध्या चढ उतार सुरु असून कधी थंडीचा कडाका तर कधी उन्हाचे चटके. हवामान विभागाने वर्तवलेल्या आनंदाजानुसार 12,13 आणि 14 फेब्रुवारी या कालावधीत राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्याने उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा अधिक प्रभाव जाणवणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार जळगाव (Jalgaon), औरंगाबाद (Aurangabad), जालना (Jalna) आणि नाशिकात (Nashik) या जिल्ह्यातील तापमानात पुन्हा एकदा घट होण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील (Marathwada) लातूर (Latur) आणि नांदेडमध्ये Nanded) देखील किमान तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.