एसटी बस ट्रकच्या भीषण अपघातात ६ जण ठार

0

नाशिक ;- येथे मुंबई आग्रा मार्गावरील राउड घाटात आज सकाळी १०च्वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. बस ट्रकला धडकली असून या अपघातात १० जण ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही धडक एवढी भीषण होती की संपूर्ण बसचे अर्ध्यातून दोन तुकडे झाले आहेत. सध्या सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून अपघाताची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एसटी बस जळगावकडून नाशिकला जात होती. त्यावेळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात झाला अशी माहिती समोर येतेय. अपघातात एसटीची एक बाजू कापली गेलीय. घटनास्थळी रक्तामांसाचा चिखल पडला होता. अनेक प्रवासी रस्त्यावर पडले. घटनास्थळावरील दृश्ये अंगाचा थरकाप उडवणारी होते. रस्त्यावर मृतदेह पडले होते. ज्या बाजूला धडक बसली त्या बाजूचे प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जखमी प्रवाशांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

चांदवडजवळ मुंबई-आग्रा महामार्गांवर मंगळवारी सकाळी एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णलायला भेट देऊन जखमीची विचारपूस करत त्यांना धीर दिला या अपघातात मयत झालेल्या प्रवाशांच्या वारसाना 10 लाख रुपयांची तर गंभीर जखमीना 5 लाख रुपयांची तातडीची मदत देण्यात येईल असे मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केलअपघाताची चौकशीचे त्यांनी आदेश दिले आहे.

जळगाव येथून नाशिककडे जाणाऱ्या एसटी बसचा चांदवड जवळ भीषण अपघात होऊन त्यात ६ प्रवाशांचा मृत्यू झाला तर 28 प्रवासी जखमी झाले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.