बाल मित्रानेच फिरविला मित्राच्या गळ्यावर चाकू !

0

जळगाव ;- बालपणापासून मित्र असलेल्या दोन मित्रांमध्ये चेष्टा मस्करी सुरु असतांना अचानक शिवी दिली गेल्याने मित्राने रागाच्या भरात मित्राच्या गेल्यावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात पवन राजू राठोड (२३, रा. समता नगर) हा तरुण जखमी झाला. ही घटना रविवार, २८ एप्रिल रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास समतानगरात घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात सकाळी ६ वाजता एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पवन राठोड व किरण गायकवाड हे दोघे जण लहानपणाचे मित्र आहेत. दोन्ही राहणार समता नगरात वास्तव्याला आहे. रविवारी २८ रोजी ते मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास समतानगरात चेष्टा करत होते. त्यात पवन याच्याकडून शिवी दिली गेली. त्याचा राग आल्याने किरण गायकवाड याने धारदार पट्टीच्या चाकूने पवनच्या गळ्यावर वार करून गंभीर दुखापत केली. त्यावेळी त्याला अन्य मित्रांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी सकाळी ६ वाजता पवन राठोड याने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून किरण गायकवाडविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि रोहिदास गभाले करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.