मुंबईत मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका
मुंबई ;- महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार महिलांच्या बाबतीत अत्यंत असंवेदनशील आहे . मरिन ड्राईव्ह येथील वसतीगृहात राहणाऱ्या एका मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली.गेल्या पंधरा दिवसात मुंबईत महिला अत्याचाराच्या दोन घटना घडल्या आहेत. तसंच, दोन दिवसांपूर्वी मस्जिद ते सीएसएमटी स्थानकादरम्यान एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उजेडात आला. या दोन घटनांवरून राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सरकारवर चांगलीच कडाडून टीका केली . आज त्या मुंबईत पत्रकार परिषद मध्ये बोलत होत्या.
दादाही महिला सुरक्षेबाबत सकाळी सविस्तर बोलले असून दिल्लीमध्ये ऑलिम्पिक विजेत्यांचीही केंद्राने ज्या पद्धतीने केस हाताळली हा पहिला मुद्दा. मरिन ड्राईव्हला जे प्रकरण झालं तिचे पालक भेटले. त्यांनीही काही मागण्या केल्या आहेत. त्याचं फॉलोअप पोलिसांकडून घेतला असून महाराष्ट्र सरकारलाही याबाबत विनंती करणार आहे. महिलांच्या विरोधात घटना होत आहेत, त्या वाढत जात आहेत. याला महाराष्ट्राचं गृहखातं जबाबदार आहे अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.