पाचोरा ;– एका शेतकऱ्याने कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घटना १५ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली
असून दिलीप हरी बोरसे (वय – ४२) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
या बाबतीत सविस्तर वृत्त असे की, येथील गव्हाई शिवारातील शशीकांत बोरसे व नथ्थू सुकदेव यांच्या सामाईक बांधावरील निबांच्या झाडाला कोणीतरी गळफास घेवुन आत्महत्या केल्याची माहिती येथील शेतकरी राजु तावडे यांनी ग्रामस्थांना दिली.
पोलिस पाटील किरण तावडे यांच्या खबरीवरुन पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पाश्च्यात्य आई, वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.