लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.७७ टक्के मतदान

0

मुंबई,;- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.७७ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

वर्धा – ३२.३२ टक्के

अकोला -३२.२५ टक्के

अमरावती – ३१.४०टक्के

बुलढाणा – २९.०७ टक्के

हिंगोली – ३०.४६ टक्के

नांदेड – ३२.९३ टक्के

परभणी -३३.८८ टक्के

यवतमाळ – वाशिम -३१.४७ टक्के

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 8 जागांसाठी मतदान पार पडत आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. या दुसऱ्या टप्प्यात विदर्भात 5 आणि मराठवाड्यात 3 मतदारसंघात मतदान होणार आहे. राज्यात एकूण 204 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी एकूण 16 हजार 589 मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निवडणुकीत 1 कोटी 49 लाख 25 हजार 912 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.