देशाला पुढे न्यायचे असेल तर नरेंद्र मोदी यांच्या शिवाय पर्याय नाही – एकनाथ शिंदे

0

पाचोरा येथे शासन आपल्या दारी उपक्रम ; हजारोंची उपस्थिती

पाचोरा ;- शासन आपल्या दारी हा चौथा उपक्रम जळगाव जिल्ह्यात होत आहे. हे सर्वसामांन्यांचे सरकार असून सरकार मदत करण्याची आमची स्पष्ट भूमिका आहे. अनेक योजना आम्ही जाहीर केल्या आहेत. देशाला पुढे न्यायचे असेल तर नरेंद्र मोदी यांच्या शिवाय पर्याय नाही. केंद्राचे आपल्याला पाठबळ मिळत आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाचोरा येथे आयोजित शासन आपल्या दारी उपक्रमात केले.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार,ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन , ना. उदय सामंत,आ. किशोर पाटील ,आ. मंगेश चव्हाण,खा. उन्मेष पाटील, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि ,हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारे आहे. शासन आपल्या दारी उपक्रमामुळे आज अनेकांना पोटदुखीझाली आहे . आता यापुढे डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम राबविणार असल्याचे बोलताच सभेत हंशा पिकला.हा पब्लिसिटी मिळविण्याचा कार्यक्रम नाही . गोरगरिबांचे,शेतकऱ्यांचे सरकार आहे, अनेकांना पोटदुखी झाली आहे.

https://fb.watch/m-SfkBcqg1/?mibextid=Nif5oz

Leave A Reply

Your email address will not be published.