Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»अंतर्गत वादाचा विजयात अडथळा नको !
    राजकारण

    अंतर्गत वादाचा विजयात अडथळा नको !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 27, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. तर दुसरीकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे यांच्या विरोधात राम शिंदे यांनी भूमिका घेतल्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील वाद पक्ष पातळीवर सोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे वाद मिटवण्यासाठी स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. मात्र, तरी वाद मिटताना दिसत नसल्याचे पाहून अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून महायुतीचे काम करा, अंतर्गत मतभेदाचा परिणाम ‘मिशन 45’ प्लस वर होता कामा नये, असे निर्देश भाजपा नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    बारामती लोकसभा मतदारसंघात एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात थेट आघाडी उघडली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम महायुतीवर होत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या संदर्भातच चर्चा सुरू असताना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनीही अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील नाराज आहेत. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांची एकत्र बैठक घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांमधील वाद कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या बैठकीनंतरही हर्षवर्धन पाटील यांचे समाधान झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या विषयी कोणतेही मत मांडण्यास हर्षवर्धन पाटील यांनी नकार दिला आहे. ही बैठक सुमारे दोन तास सुरू होती. मात्र, तरीही वाद मिटला की नाही, याबाबत माहिती समोर आलेली नाही.

    फडणवीसांनी दिला नेत्यांना समज

    अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघांमध्ये राम शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. राम शिंदे आणि विखे पाटील यांच्यातील वाद मिटवण्यासाठी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये सर्व नेत्यांनी महायुतीचा उमेदवार विजयी होईल, बाकी सर्व बाजूला ठेवा, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात संकेत दिले आहेत. अंतर्गत वादामुळे महायुतीच्या उमेदवारास परिणाम होता कामा नये, अशी समज देवेंद्र फडणवीस यांनी सर्व नेत्यांना दिली आहे.

     

    #bjp #maharashtra Devendra Fadnavis mahayuti
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    बंडाची तलवार म्यान?

    June 6, 2026

    सर्वसामान्यांचा वारकरी..!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif