लोकशाही न्यूज नेटवर्क
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा मला जीव मारण्याचा डाव आहे. ते कोणाला मोठे होऊ देत नाही. महादेव जानकर यांनाही त्यांनी मोठे होऊ दिले नाही. त्यांच्या बामणी कावा आता चालणार नाही, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना शिवीगाळ केली. त्यानंतर समाजातील लोक व्यासपीठावर येऊन त्यांची समजूत काढण्यासाठी सुरुवात केली. घडलेल्या प्रकारानंतर मनोज पाटील यांच्या मुंबईतील सागर बंगल्याकडे रवाना झाले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दिले उत्तर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील आंधळी धरणावर आले होते. मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याबद्दल त्यांना माध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर देऊन बोलणे टाळले. फडणवीस म्हणाले की, ‘मनोज जरांगे काय बोलले मी ऐकलेच नाही. यामुळे मी कशा कशाला उत्तर देऊ.’