वरणगावात २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या…

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शहरातील सिध्देश्वर नगरात वास्तव्यास असलेल्या २४ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दि ९ मंगळवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकिस आली आहे.

याबाबत सविस्तर वृत असे की, शहरातील सिध्देश्वर नगरात राहणारा चेतन डिगाबंर माळी (२४) हा तरुण मागील काही वर्षापासून पुणे येथे खासगी कंपनीत नोकरी करीत होता, तो नातेवाईकाचे लग्न असल्याने गावी आला होता. मंगळवार दि ९ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास आजी व मावस भावाला लग्नासाठी नागेश्वर मंदिरात सोडून घरी परत आला व आपल्या राहत्या घरात छताच्या लाकडी खांबाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान आजी व मावसभाऊ घरी परतल्यावर दार उघडताच समोर दृश्य बघताच त्यांनी मदतीसाठी आरडा ओरड केल्याने ही घटना लक्षात आली.

आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही

चेतन हा शांत व मन मिळावू स्वभावाचा असल्याने त्याच्या या टोकाच्या निर्णयाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तो लहानपणा पासून वरणगाव येथे त्याचा मावशी कडे राहत होता. तो मुळ मध्य प्रदेश च्या खकनार येथील रहिवाशी होता. या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये विशाल माळी यांच्या खबरी वरून अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॅन्सटेबल मनोहर पाटील हे करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.