मुंबई ;- आमचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्याच्यावर फक्त शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. आता औपचारीक शिक्कामोर्तब पुढच्या आठ ते दहा दिवसात होईल अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.बाकी फॉर्म्युला मागच्या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेत्या सोनीया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक झाली. तिथे अनौपचारीक चर्चा झाली आहे
राज्य सरकारवर निशाणा साधत सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्यापद्धतीने महाराष्ट्रातली उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहेत. महाराष्ट्रावर अन्याय जो होतोय आज केंद्र सरकारचा दोन दिवसांपूर्वी जो डेटा आला होता त्यामध्ये उत्तरप्रदेश आणि बिहार ही राज्य अनेक सामाजिक कार्यक्रमांसाठी महाराष्ट्राच्या पुढे आहेत. विकासाचा दर असेल, गुंतवणुक असेल किंवा वातावरण हे महाराष्ट्रापेक्षा बऱ्याच राज्यांमध्ये जास्त आहे. असाच केंद्र सरकारचाच डेटा दाखवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये असलेल्या ट्रीपल इंजिन खोक्याचे सरकार आहे, त्यांच्याकडे जरी 200 आमदार असतील तरी 200 आमदारांच्या मानाने विकास संथगतीने होताना दिसत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.