मणिपुरमध्ये सूर्य का उगवत नाही – उद्धव ठाकरे

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

शिवसेनेच्या ५७व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात आपल्या भाषणात बोलतांना उद्धव ठाकरे यांनी भाजप शासित मणिपूर राज्यातील परिस्थितीवर भाष्य करतांना देवेंद्र फडणवीसांना चांगलेच धारेवर धरले आहे. कोरोना लसीवरील आणि सूर्याकडे थुकन्याच्या विधानावर उत्तर देत म्हंटले कि, हा सूर्य मणीपुरात का उगवत नाही.

प्रसंगी त्यांनी राहुल गांधींच्या अमेरिकेतील विधानाचा उलेक्खा करत म्हटले कि, राहुल गांधीनी केलेले वक्तव्याला मी सहमत आहे. “ब्रम्हदेवाच्या बाजूला बसून जग चालवायचे कसे” असे विधान अमेरिकेत गांधी यांनी केले होते. त्याचा बरोबर मी मन कि बात नाही मणिपूर कि बात करतोय.

ते पुढे म्हणाले कि, ही गर्दी पैसे देऊन जमवलेली नाही. भाजपचे सगळे एकापेक्षा एक आवली आहेत, लव्हली कोणीच नाही. आणि अवली लोकांमुळे आता जनताही कावली आहे.

ठाकरेंच्या भाषणाआधी हास्य जत्रा हा कॉमेडी शो ठेवण्यात आला होता. त्याचा संदर्भ घेत ठाकरेंनी शिंदेंवर निषाणा साधला. आपल्या भाषणाच्या सुरुवातील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. “असे अंधभक्त म्हटल्यावर त्यांना लस देण्याची गरज आहे, सगळ्या मानसिक रुग्णांना समीर चौघुलेंच्या रुग्णालयात न्यावे लागणार आहे, सगळेच अवली आहे, एकापेक्षा एक अवली आहे, लवली कुणीच नाही”, असं म्हणतं ठाकरेंनी शिंदे गटाची खिल्ली उडवली आहे.

ठाकरे म्हणाले, हॉल गच्च भरला आहे, कोणीही उठुन जात नाहीये कारण ही कडवट निष्ठावंत शिवसैनिकांची गर्दी आहे, आपल्या शहराच्या एका कोपर्‍यामध्ये इकडे गर्दी आहे तसे तिकडे गारदी जमले आहेत. गारदी शब्दाचा अर्थ. पूर्वी पेशवे काळात लढाईत गोंधळ घालण्यासाठी, वसुली करायला भाडोत्री टोळ्या ठेवल्या जायच्या, तशी ती गारदींची टोळी तिकडे जमली आहे. इकडे गर्दी, तिकडे गारदी!. आज बर्‍याच दिवसानंतर चेहर्‍याचा उपयोग हसण्यासाठी पण आहे जाणवलं, नाहीतर नुसत तू तू मैं मैं चाललं आहे. आपण काही बोललं की ते बोलणार आणि ते बोलले की आपण!

दुसऱ्यांना छळायचं यांचा त्यांना जास्त आनंद होत आहे. पंतप्रधान हे अमेरिकाला गेले आहे. त्यांचं अंधभक्त म्हणतात सुऱ्यावर थुंकू नका, कोण सुर्य कसला सूर्य, तुमच्या लेखी सूर्य असेल. सगळ्याच ठिकाणी उगवत नसेल तर काय कामायचं, मग संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देण्याची गरज आहे का? उद्धव ठाकरे

 

डब्बल इंजिन सरकार आहे म्हणे, पण पुढे जातच नाही, फक्त वाफेचं इंजिन आहे. हास्यजत्रेच्या कलाकारांनी आम्हाला हसवलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी एक प्रयोग सादर केला आहे. त्यांचा व्हिडीओ आहे माझ्याकडे, त्यांचाच व्हिडीओ लागेल. ‘”आपण सगळे इथं एकत्र बसू शकलो म्हणजे, कोविडची व्हॅकसीन मोदींनी तयारी केली” फडणवीस यांचा व्हिडीओ माईकवर चालवला. यांच्या डोक्यात कुठून व्हायरस घुसला हेच कळत नाही. कोविडची लस मोदींनी तयार केली मग बाकीचे काय गवत उपटत होते का, संशोधक काय गवत उपटत होते का? असा टोलाही ठाकरेंनी लगावला आहे.

राजीव गांधी-नरसिंह राव असताना मुस्लिम खतरे मै है अशा घोषणा व्हायच्या. आता 10 वर्ष हे सत्ता चालवत आहेत, आता काय घोषणा होत आहेत, मग हिंदुत्ववादी कोण? भाजप का काँग्रेस. हिंदू आक्रोश करत आहेत याचा अर्थ सरकार चालवायला तुम्ही लायक नाही आहात. काश्मीरपासून कन्याकुमारीपासून हिंदू आक्रोश करत असतील तर तुम्ही सरकार चालवायला नालायक आहात. तुम्ही विरोधकांना संपवायच्या मागे लागला आहात, हिंमत असेल तर तुम्ही देशाच्या विरोधकांना संपवाना.

भाजपला उपयोग आहे तोपर्यंत दूध पाजतील, पुंगी वाजवतील. नंतर टोपलीत गुंडाळून देतील सोडून. हे आल्यानंतर पाऊस लांबणीवर चालला आहे. जर यांचं राज्य असेल आणि बळीराजावर संकट आलं तर मदत अजिबात होणार नाही. जाहिरातीवर जेवढा खर्च केला तेव्हढा शेतकऱ्याला दिला असता तर शेतकरी खूश झाला असता. असेही ठाकरे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.