दुर्गम आदिवासी भागातील एकोणावीस शाळा होणार बंद…

0

 

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

राज्य सरकारने नविन शैक्षणीक धोरण लागु करण्याचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले असून या शैक्षणीक धोरणामुळे आदीवासी व ईतर गरीब मुले शिक्षणापासुन वंचीत राहण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. राज्यशासनाने गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होणार नाही, यासाठी पर्यायी मार्ग काढावा अशी मागणी विद्यार्थी पालकांकडुन व्यक्त करण्यात येत आहे.

यावल तालुक्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या दुर्गम भागातील चार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांसह 19 शाळांमधे २० व २० पेक्षा पटसंख्या कमी असलेल्या शाळांचा यात समावेश आहे. शासनाने या शाळा बंद केल्यास दुर्गम भागातील आदीवासी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या नविन शैक्षणीक धोरणानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वीस व वीस पेक्षा कमी असल्याने त्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासन विचाराधीन आहे.

यावल तालुक्यातील दुर्गम भागातील शाळेतील पटसंख्या

टेंभी- कुरण प्राथमिक शाळा १०, टाकरखेडा १५, वाघळूद २०, साखर कारखाना फैजपूर १३, उर्दू शाळा बामनोद १९, चिखली बुद्रुक १८, नावरे १४, चारमळी १९ (आदीवासी दुर्गम भाग), वड्री १४ (उर्दू शाळा), इचखेडा १६, पाझर तलाव १३ (आदीवासी दुर्गम भाग), मोर धरण ११, वीटवे १४ (हिंगोणा जवळ), भोरटेक १९,करंजी १८, पाडळसे १७ (उर्दू शाळा),  पिळोदा खुर्द २०, लंगडा आंबा१४ (आदीवासी दुर्गम भाग), धुपघाट ९  (आदीवासी दुर्गम भाग)

ही माहिती यावल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी नईम शेख यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.