वर्धा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
आपल्या सासऱ्याची संपत्ती एकट्याला मिळावी या अनुषंगाने सख्ख्या साडूनेच आपल्या साडू ला जीवे मारल्याची घटना वर्ध्यातील पिंपळेमठ परिसरात घडली आहे. चित्रपटाच्या कथे प्रमाणे कट रचत हा खून केला आहे. विषारी दारू पिऊन मोरेश्वर पिंपळेचा मृत्यू झाला असे समजून सुरूवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र तपासात ही हत्या असल्याचे उघडकीस आले आहे. त्याप्रमाणे दोषीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, आरोपी संदीप पिंगळे याचा साडू मोरेश्वर पिंपळे सोबत वाद झाला होता. त्यानंतर संदीप पिंगळे सहा महिन्यापासून मोरेश्वरला मारण्याचा कट रचत होता. गोकुळाष्टमीच्या दिवशी त्याने मृत मोरेश्वर पिंपळेला फोन करून घराबाहेर बोलावलं आणि त्याला दारूची बाटली दिली. ती दारू पिऊन मोरेश्वर हा अस्वथ होऊन कोसळला.
मोरेश्वरला सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं. याप्रकरणी सेलू पोलिसांनी 19 ऑगस्टला अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र मोरेश्वरच्या पत्नी आणि नातेवाईकांनी या विषयी संशय व्यक्त केला. पोलिसांनी आरोपी संदीप पिंपळेची विचारपूस केली त्यांना त्याच्या जबाबावरून शंका येताच. त्याला पोलीसी खाक्या दाखवताच संदीप पिंपळे याने आपला गुन्हा कबूल केला.
आरोपी संदीपने जडीबुटी विकणाऱ्यांकडून विष आणलं होतं. याप्रकरणी जडीबुटी विक्रेते यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. विजयसिंह चितोडीया (41) आणि राजकुमार चितोडीया (22) असं विष देणाऱ्या आरोपींची नावं आहेत.
धक्कादायक म्हणजे आरोपी संदीप स्मशानात अंत्यसंस्कारालाही गेला आणि नातेवाईकांनाही भेटला होता. मात्र मोरेश्वरच्या मृत्यूमागे त्याचाच हात असल्याचं समजल्यावर सर्वांनाच धक्का बसला. पोलिसांनी घटनास्थळी जप्त केलेली बॉटल प्रयोगशाळेत पाठवली आहे. व घटनेचा पुढील तपास करत आहेत.