कापसाला १२ हजारांचा भाव मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

0

जळगाव ;- जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज दि.१४ रोजी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे शेतकऱ्यांच्या कापसाला १२ हजार भाव मिळावा यासाठी उपोषण सुरु केले आहे. या बेमुदत उपोषणाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील हे करीत आहे.
बळीराजांना वंदन व पूजन करून, कापसाला १२ हजार रु. प्रती क्विंटल भाव मिळावा यासाठी आमरणउपोषण करण्यात येत असल्याचे युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले


.
यावेळी माजी मंत्री अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर,मा.आ.कैलास पाटील,जिल्हाध्यक्ष रविंद्रमैया पाटील, महानगरअध्यक्ष मंगलाताई पाटील, जेष्ठ नेते प्रमोद नाना पाटील, संजय गरुड, ,रोहिणीताई खडसे प्रदीप लोढा, एजाज मलिक, वाल्मिक पाटील,कल्पिता पाटील, योगेश देसले,उंमेश नेमाडे यांच्यासह शेतकरी बांधव आदीं उपस्थित होते. आज उपोषणाचा पहिला दिवस आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.