मणिपूरमध्ये मोदी सरकारने हिंदुस्थानची हत्या केली – राहुल गांधी

0

नवी दिल्ली ;– मणिपूर मध्ये मोदी सरकारने भारतीयांची हत्या केल्याचा आरोप आज खासदार राहुल गांधी यांनी संसदेत केला.
लोकसभेची खासदारकी परत मिळाल्यानंतर राहुल गांधींनी बुधवारी केलेल्या पहिल्याच भाषणात मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असून या प्रस्तावावर सध्या दोन्ही बाजूच्या सदस्यांकडून भाषणे सुरु असून गुरुवारी १० ऑगस्ट रोजी त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार असल्याचं सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधींनी केलेल्या भाषणात मोदी सरकारवर अतिशय तिखट शब्दांत टीका केली. . “मोदी सरकारने मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या केली”, असं राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले.

नरेंद्र मोदी “यांनी मणिपूरमध्य हिंदुस्थानची हत्या केली आहे. यांच्या राजकारणानं मणिपूरला नाही, हिंदुस्थानला मणिपूरमध्ये मारलं आहे. हिंदुस्थानची हत्या केली आहे. यांनी मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली. तुम्ही मणिपूरच्या लोकांना मारून हिंदुस्थानची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात. त्यामुळेच तुमचे पंतप्रधान मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत. कारण त्यांनी मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली आहे. तुम्ही भारत मातेचे रक्षक नसून भारत मातेचे खूनी आहात”, अशा आक्रमक शब्दांमध्ये राहुल गांधींनी हल्लाबोल केला.

मोदी हिंदुस्थानच्या हृदयाचं ऐकत नाहीत, तर इतर दोन व्यक्तींचं ऐकतात. रावण दोन लोकांचं ऐकायचा. मेघनाथ आणि कुंभकर्ण. तसंच नरेंद्र मोदी दोन लोकांचं ऐकतात. अमित शाह आणि अदाणी. लंकेला हनुमानानं जाळलं नव्हतं. लंकेला रावणाच्या अहंकारानं जाळलं होतं. रामानं रावणाला नव्हतं मारलं. रावणाच्या अहंकारानं त्याला मारलं होतं. तुम्ही पूर्ण देशात केरोसिन फेकत आहात. मणिपूर, हरियाणात तुम्ही तेच करत आहात. पूर्ण देशाला तुम्ही जाळायला निघाला आहात. तुम्ही पूर्ण देशात भारत मातेची हत्या करत आहात”, असेही राहुल गाधी म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.