नवी दिल्ली ;- पंतप्रधान मोदींच्या हातात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा रिमोट कंट्रोल असून, ही बीआरएस म्हणजे भाजपचीच बी टीम आहे व बीजेपी रिश्तेदार समिती हे त्यांचे खरे नाव असायला हवे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज येथील सभेत चंद्रशेखर यांच्यावर चढवला.
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राव आणि त्यांच्या पक्षाचे नेते भाजपच्या हुकमाचे ताबेदार झाले असल्याचा आरोप राहुल यांनी केला. याचसाठी जिथे बीआरएसचा सहभाग असेल अशा कुठल्याही आघाडीत काँग्रेस सहभागी होणार नाही, असे आपण सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना सांगितल्याचा दावाही त्यांनी केला.
खरे तर भाजपची ही रिश्तेदार समितीच असून केसीआरना ते राजे आणि तेलंगणा त्यांचे साम्राज्य असल्यासारखे वाटत आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसने संसदेत नेहमीच भाजपला विरोध केला आहे आणि बीआरएस ही भाजपचीच बी टीम आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.