अंत्यविधीतून परततांना ट्रकने महिलांना चिरडले; एकाच कुटुंबातील तीन महिला ठार…

0

 

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

आपल्या नातेवाकाचा अंत्यविधी करून घरी जातांना जमावामध्ये ट्रक घुसून मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना पंढरपूर पासून जवळ असलेल्या टेंभुर्णी रोडवरील टाकळी पुनर्वसन गावानजीक रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्त असे कि, गुनदेव गुटाळ यांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला होता. सर्व नातेवाईक त्यांच्या अत्यंविधीसाठी गेले होते. रात्री उशिरा अत्यंविधी उरकून सर्वजण घराकडे परत येत असताना अचानक टेंभुर्णीहून पंढरपूर कडे येणारा मालवाहू ट्रक अचानक गर्दीत घुसला. यामध्ये एकाच कुटुंबातील ३ महिलांचा जागीच मृत्यू झाला तर इतर सहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हिराबाई भारत गुटाळ (35) मुक्ताबाई गोरख गुटाळ (40) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या दुदैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.