विद्यापिठात संशोधन पेपर लेखन या विषयावर व्याख्यान

0

जळगाव ;- पुढील महिन्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिक शास्त्र विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची लष्करी निती या विषयावर होणाऱ्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या पार्श्वभूमीवर सोमवारी संशोधन पेपर लेखन या विषयावर व्याख्यान झाले.

या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी संशोधन पेपर लेखन कशाप्रकारचे केले जावे याबाबत डॉ. मनीषा इंदाणी यांनी सविस्तर माहिती दिली. विद्यापीठातील १५० विद्यार्थ्यांनी या व्याख्यानात सहभाग घेतला. प्रमुख पाहुणे म्हणून कला व मानव्य विद्या प्रशाळेचे प्रभारी संचालक डॉ. राम भावसार, श्री. विजय आहेर, डॉ. विना महाजन, डॉ. तुषार रायसिंग, विशाल चव्हाण, पुजा कोळी, मनोज गुरव हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.