“मंत्रिपद गेलं खड्ड्यात..” गुलाबराव पाटलांचा संताप

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari), भाजप नेते मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister Mangalprabhat Lodha) यांनी शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यातच आता भाजप आमदार प्रसाद लाड (BJP MLA Prasad Lad) यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्म कोकणामध्ये झाला होता, असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. दरम्यान प्रसाद लाड यांच्या या वक्तव्यानंतर तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. यावर आता मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गुलाबराव पाटील यांनी प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, मंत्रीपद गेलं खड्ड्यात. शिवरायांच्याबाबतील कोणीही बोलण्याची गरज नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा असो. ज्यांना शिवराय माहीत आहेत त्यांनीच बोलावं. शिवरायांबद्दल बोलताना आता आचारसंहिता करण्याची गरज आहे. कारण सध्या कोणीही येतो आणि शिवरायांबद्दल बोलतो. मंत्रीपद गेलं खड्ड्यात त्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.