मोठी बातमी; सरकार समोर अट ठेऊन जरांगे पाटलांच उपोषण मागे… म्हणाले, वेळ घ्या, मात्र आरक्षण द्या…

0

 

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांच्या उपोषणं बाबतील एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. या शिष्टमंडळात मंत्री उदय सामंत, धनंजय मुंडे यांच्यसह इतर महत्वाच्या नेत्यांचाही समवेश होता.

जरांगे यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी आणखी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. मात्र त्यांनी “मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या.” ही एक अट ठेवली आहे. तसेच सर्व आंदोलन आता बंद करा, असं आवाहन जरांगे यांनी राज्यभरातील मराठा आंदोलकांना केलं आहे.

आपल्याला लढाई जिंकण्याची आहे, ती जिकणार. मी मराठ्यांचा अपमान होऊ देणार नाही. सरकारला वेळ द्यायची का, असं त्यांनी यावेळी आंदोलकांना विचारलं. यानंतर उपस्थित सर्व आंदोलकांनी एक सुरत याला होणार दिला. यानंतर आपण आंदोलन स्थगित करत असल्याचं जरांगे म्हणाले.

राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांना आरक्षण देण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ मागितला. मात्र मनोज जरांगे पाटील हे 24 डिसेंबरपर्यंत वेळ देण्यास ठाम होते. यानंतर सरकारी शिष्टमंडळाने विनंती केल्यानंतर त्यांनी आरक्षण देण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत सरकारला वेळ दिली आहे. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले आहेत की, “वेळ घ्या, मात्र आरक्षण द्या”…

Leave A Reply

Your email address will not be published.