लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असून जामनेर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २५ वर्षीय महिला शुक्रवार १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास महिला घरी असताना गावात राहणारा ईश्वर गायकवाड याने घरी येऊन तिचा हात पकडून तिचा विनयभंग केला. तसेच आरडा ओरड केली तर तुला जिवंत मारून टाकीन अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर तक्रारीवरून आरोपी ईश्वर राजाराम गायकवाड यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक अतुल पवार करीत आहे.