या चोरांपुढे पोलीसही हरले… संपत्ती इतकी कि व्हाल थक्क…

0

 

जयपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

राजस्थानातून एक अत्यंत चक्रावून सोडणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यांनी केलेले कृत्य पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले आहे. आपण आजवर श्रीमंतांना लुटून गरीबांना पैसे देणारे रोबिनहूड ही पाहिलेत आणि  स्वतःच्या मास्तीसाठी चोरी करणारे अनेक चोर पहिले आहे. पण विमानातून जाऊन लोकांना भंडावून सोडणारी  राजस्थानात या ठकसेनांची एकच टोळीच सक्रिय आहे. ज्यांचे खाण्याचे वांदे होते अशा या ठकसेनांची संपत्ती पाहून पोलिसांचा विश्वासच बसेना. नेमकं काय प्रकरण आहे हे तेच जाणून घ्या. पोलिसांनी जेव्हा ही टोळी पकडली, तेव्हा जी माहिती मिळाली त्याने पोलीस चक्रावूनच गेले.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मेवात गँगच्या ठकसेनांची ही टोळी आहे. या गँगच्या ठकसेनांवर आधी लाखो रुपयांचे कर्ज होते. कुणाचे खाण्याचे वांदे होते. मात्र, या गँगमध्ये सामील झाल्यापासून ते मालामाल झाले. काहींना कार घेतली. काहींनी फ्लॅट तर काहींनी शोरूम उघडले. तर काहींनी आपल्या अंगावरील लाखो रुपयांचं कर्ज काही दिवसातच फेडलं. सर्व काही ठकवलेल्या पैशातून केलं. आणि हा पैसा बँकांना फसवून मिळवलेला होता. हे ठकसेन राजस्थानच्या बाहेर विमानाने जायचे. ग्रामीण भागातील एटीएममधून पैसा काढायचे आणि महागड्या हॉटेलात राहून मौजमजा करायचे. धक्कादायक बाब म्हणजे हे लोक ओळखीच्या लोकांकडून भाड्याने एटीएम कार्ड घ्यायचे. त्या एटीएम कार्डद्वारे पैसा काढायचे आणि कमिशन म्हणून ओळखीच्या लोकांना 50 टक्के रक्कमही द्यायचे. त्यामुळे या ठकसेनांवर कुणाचाच संशय राहत नव्हता.

हे ठकसेन आधी लोकांशी संपर्क करायचे. त्यानंतर त्यांचं एटीएम पिननंबरसहीत भाड्याने घ्यायचे. त्यानंतर तिकीट बूक करून जयपूर विमानतळावरून फ्लाईटने इतर राज्यात जायचे. दुसऱ्या राज्यातील ग्रामीण भागात ते जायचे. ज्या ठिकाणी एटीएममध्ये लाईट आणि सीसीटीव्हीची सुविधा नसेल अशा ठिकाणी जायचे. त्यानंतर त्या एटीएममधून पैसा काढायचे. त्यानंतर ते ज्यांच्याकडून एटीएम कार्ड घेतलं त्यांना फोन करायचे. इतर राज्यातून आमच्या एटीएममधून पैसे काढले पण मध्येच अडकल्याची तक्रार बँकेत करायला सांगायचे. त्यानंतर नियमानुसार तक्रारीनंतर एक आठवड्यानंतर ती रक्कम पुन्हा खात्यात येताच हे ठकसेन ती रक्कम खात्यातून काढून घ्यायचे. या कामात दोन लोक सामील व्हायचे. एकजण एटीएमच्या बाहेर असायचा. तर दुसरा आत असायचा. एकजण एटीएमच्या बाहेर पॉवर सप्लाय करणाऱ्या स्विचवर हात ठेवायचा. तर दुसरा कॅश विथ ड्रॉ करायचा. जेव्हा कॅश एटीएममधून बाहेर यायची तेव्हा बाहेर उभा असलेला व्यक्ती लगेच स्विच बंद करायचा. त्यामुळे एटीएममधून पैसेही निघायचे आणि खात्यातून पैसेही कापले जायचे नाहीत.

जयपूर आंतरराष्ट्रीय विमातळावर हे ठकसेन हैदराबादच्या फ्लाईटने येणार असल्याची आम्हाला खबर मिळाली. त्यानंतर सीआयडी, डीएसटी आणि विमानतळ पोलिसांनी विमानतळावर दबा धरला. आणि पाच ठकसेनांना अटक केली. विशेष म्हणजे या ठकसेनांची लाइफस्टाईल पाहून पोलीसही थक्क झाले. त्यांना अटक करावी की नाही असा प्रश्न पोलिसांना पडला. पण त्यांच्या संदिग्ध हालचालीमुळे त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती डीसीपी ज्ञानचंद यादव यांनी दिली. पोलिसांनी जुबेर खान, लुकमान दीन, सद्दाम खान, इलियास आणि मुस्ताक मोहम्मद यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 75 एटीएम कार्ड आणि 2.31 लाख रुपये रोख रक्कम ताब्यात घेतली आहे. हे सर्व आरोपी भरतपूर जिल्ह्यातील डीग येथील राहणारे आहे. सायबर ठकसेनांसोबत ते कमिशनवर काम करत होते. त्यांना एटीएममधून पैसा काढण्याचा टास्क मिळायचा. त्यानंतर ते महाराष्ट्र आणि तेलंगना सारख्या राज्यात फ्लाईटने जाऊन पैसे काढायचे. त्यांनी आतापर्यंत किती लुटमार केली याचा आकडाही त्यांना माहीत नाही. त्यांनी अनेक नॅशनल बँकांना कोट्यवधी रुपयाचा चुना लावला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.