वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क :
भुसावळ तालुक्यातील हतनुर येथील धरणाच्या कामासाठी आलेल्या मजुर पतीने रागाच्या भरात पत्नीला ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या बाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील हतनुर धरणाच्या कामाला उत्तर प्रदेश मधिल सकती नगर ( राज किसन कॉलणी ) येथुन जितेंद्र गंगाराम हेमराम (२५) व पत्नी शांती देवी (३६) हे आदीवाशी कुटूंब मागील दोन महिण्या पासून मजुरीच्या कामा निमीत्त आले होते. त्यात दोन्ही पती पत्नीला दारूचे व्यसन होते. असेच दि १७ रविवार रोजी दुपारच्या वेळी पतीने दोघांसाठी दारु आणली होती मात्र, सायंकाळच्या जेवणाच्या आधीच पत्नी शांतीदेवीने दारू एकटीने संपविली, थोड्या वेळाने पती जितेंद्र घरी येऊन घरातील दारू हुडकत होता त्याला दारू न सापडल्याने, त्याने पत्नीला माझ्या वाटेची दारू कुठे आहे असे विचारले असता ती मी प्यायल्याचे सांगताच पतीने पत्नीला रागाच्या भरात लाथा बुक्याने मारहाण करून तीचा गळा दाबून ठार केले. त्यानंतर पती घरात बसून होता मात्र बराच वेळ झाला तरी यांचा आवाज का येत नाही म्हणून शेजारी त्यांच्या घरा जवळ येऊन विचारपुस करताच, पती जितेंद्र याने माझी पत्नी उठत का नाही, तिला बघा त्यांनी सागीतल्या नंतर शेजाऱ्यांनी तिला उपचारासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरानी तपासणी करुन तिला मृत घोषित केले.
या बाबत वरणगाव पोलीसांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा द वी कलम ३०२ प्रमाणे पती जितेंद्र हेमराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सह पोलीस निरिक्षक आशिष आडसुड हे करीत आहे.
पोलीसांनी दाखविली मानुसकी..
अपराध कसा घडला याचा उलगडा करून पोलीसानी तपास चक्र फिरवून संशयीत आरोपी मयताच्या पतीस अटक केली, मात्र शवविच्छेदन झाल्या नंतर मयताचे अत्यविधी साठी नातलग कोणीच नसल्याने पती जितेंद्र यास अग्नीडाग देण्यासाठी पोलीस बंदोबस्तात त्याला हतनुर येथे नेऊन मानुसकीचे दर्शन घडविले.