दगडी ग्राम पंचायत स्वंतत्र करण्याची मागणी…

0

 

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

मनवेल ग्राम पंचायतला जोडुन असलेल्या दगडी या गावाची लोकसंख्या सहाशेच्या वर असून त्यात स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्त करीत आहे.

दगडी या गावात टोकरे कोळी व आदीवासी भिल्ल समाज मिळून ६०० पेक्षा जास्त लोकसंख्या असून आदीवासी वस्तीचे गाव आहे. मनवेल गृप ग्रामपंचायतला दगडी गाव जोडण्यात आले असून प्रभाग क्रमांक एक मध्ये येथील नागरिक मतदान करतात. तर पुर्ण गाव आदीवासी असून या गावातील दोन सदस्य निवडून येतात.

मनवेल ग्रामपंचायतला दगडी गाव जोडण्यात आले असल्यामुळे शासनाच्या पेसा योजना अंतर्गत असलेल्या विविध योजनेच्या लाभ येथील ग्रामस्थांना स्वतंत्र ग्रामपंचायत नसल्यामुळे मिळत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्त वंचित आहे.  स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहे.

दगडी ग्रामपंचायत स्वतंत्र करण्यात यावी अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली आहे. यावल प.स.,तहसिलदार व जिल्हाधिकारी जळगाव यांना ग्रामस्थांच्या सह्यांनिशी निवेदन देण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.