लग्नाआधीच हुंड्यासाठी छळ ; तरुणीने संपवले जीवन

1

लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव : शहरातील लग्न ठरल्या नंतर लग्नाआधीच हुंड्याचे दागिने व पैशांसाठी होणारा छळ, तसेच होणाऱ्या पतीनेच जाड म्हणून हिणवले व लग्न मोडण्याची धमकी दिल्यामुळे रामेश्वरी रवींद्र नागपुरे (२४) या उच्चशिक्षित तरुणीने घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

रामेश्वरी हिचे भूषण ज्ञानेश्वर पाटील ऊर्फ बारी याच्याशी लग्न ठरले होते. ६ मार्च रोजी साखरपुडा झाला होता, तर १८ मे रोजी विवाह होणार होता. परंतु साखरपुडा होताच काही दिवसांनी भूषण व त्याच्या आईकडून दागिने, पैशांचा तगादा सुरू झाला. त्यानुसार दागिने व रोख रक्कम दिली. त्यानंतर पुन्हा भूषणकडून हिणवणे सुरू झाल्याने तिने हे पाऊल उचलले.

1 Comment
  1. Dharmendra Badgujar sir says

    अशा मूर्खांची धींड काढून आजन्म कारावासाची शिक्षा दिली पाहीजे . मुलगी पसंत पडल्या नंतर तिला हिणवणे चुकीचे आहे . अशा मूर्खांचा त्रास इतर मुलोना होत असतो .

Leave A Reply

Your email address will not be published.