आई-बाप न होता आल्याच्या दुःखात दाम्प्त्याचं थेट टोकाचं पाऊल…

0

 

सातारा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

विज्ञानाच्या युगात अशक्यप्राय गोष्टीही सहज शक्य होऊ लागल्या आहेत. त्यामुळे आजचे जग चंद्रावर तर सोडा आता मंगळावर देखील पोहोचत आहे. मात्र, अशातच साताऱ्यातून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्याला आई-बाप न होता आल्याच्या दुःखात एका दाम्प्त्याने थेट टोकाचं पाऊल उचललं. साताऱ्यातून ही अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. यात एका दाम्प्त्याने मूल होत नसल्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

तानाजी राजपुरे आणि त्यांची पत्नी पुजा हे दोघंही अनेक दिवसांपासून मूल व्हावं यासाठी प्रयत्न करत होते. वैद्यकीय उपचारांनाही यश न आल्याने दोघंही खचले. तानाजी हे शेतकरी कुटुंबातील होते. अखेर लग्नानंतर 10 वर्षांनी दोघांनीही टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. या घटनेनं एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही धक्कादायक घटना साताऱ्यातील वाई तालुक्यातील कणूर गावात घडली आहे. तानाजी राजपुरे आणि पत्नी पुजा राजपुरे अशी मृतांची नावं आहेत. या दोघांचा 10 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, 10 वर्षांच्या त्यांच्या संसाराचा अतिशय हृदयद्रावक अंत झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.