किती सहन केले आम्हाला माहिती, फडणवीसांना अटक झाली असती

0

चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य : ध्यानीमनी नसतानाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री

सोलापूर ;- भाजप नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवेढ्यातील एका सभेत बोलताना धक्कादायक वक्तव्य केले. देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही क्षणी अटक झाली असती. मी राज्याचा अध्यक्ष होतो. 33 महिने आम्ही काय सहन केले, हे आम्हाला माहित आहे. पण मला खात्री होती हेही दिवस जातील आणि ते दिवस गेले कोणाच्या ध्यानीमनी नसतानाही एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले, असे धक्कादायक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा शहरात आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, सोलपूरची निवडणूक कठीण नाही आहे. माढ्याची निवडणूक कठीण नाही ती कठीण केली आहे. ईश्वराला सगळ्यांची काळजी आहे. तो त्याचे संतुलन बरोबर करत असतो. मी राज्याचा अध्यक्ष होतो 33 महिने आम्ही काय सहन केल आहे हे आम्हाला माहित आहे. पण मला खात्री होती हे देखील दिवस जातील आणि चांगले दिवस येतील. त्यामुळे चांगले काम करत राहा. चांगल्या कामाचे चांगले फळ मिळते.

फडणवीसांना कुठल्याही क्षणी अटक झाली असती…
देवेंद्र फडणीस यांना कोणत्याही क्षणी अटक झाली असती मी राज्याचा अध्यक्ष होतो 33 महिने आम्ही काय सहन केल आहे हे आम्हाला माहित आहे कुठल्याही क्षणी देवेंद्र फडणवीस यांना अटक झाली असती. पण मला खात्री होती हेही दिवस जातील आणि ते दिवस गेले कोणाच्या ध्यानीमनी नसतानाही एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. महाविकास आघाडीच्या राज्यातील सत्तेच्या काळात अशी वेळ आली होती असे सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.