नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
केंद्र सरकारने आज भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मोठी घोषणा केली आहे. कर्पूरी ठाकूर यांना “भारतरत्न” (मरणोत्तर) देण्यात येणार असल्याचे केंद्राने मंगळवारी सांगितले. कर्पूरी ठाकूर हे बिहारचे माजी मुख्यमंत्री होते आणि ते मागासवर्गीयांच्या हिताचे समर्थन करण्यासाठी ओळखले जात होते.
बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रपतींनी जारी केलेल्या निवेदनात त्यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली आहे. समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. बिहारमध्ये सार्वजनिक नेते म्हणून उदयास आलेल्या कर्पूरी ठाकूर यांचा जन्म 1924 मध्ये झाला.
कर्पूरी ठाकूर हे बिहारचे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री होते. ते दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री आणि एकदा उपमुख्यमंत्री होते. कर्पूरी ठाकूर 1952 मध्ये पहिली विधानसभा निवडणूक जिंकून पहिल्यांदा आमदार झाले आणि आयुष्यभर विधानसभेचे सदस्य राहिले. 1967 मध्ये, जेव्हा देशातील नऊ राज्यांमध्ये पहिल्यांदा बिगर-काँग्रेस सरकारे स्थापन झाली, तेव्हा ते बिहारच्या महामाया प्रसाद सरकारमध्ये शिक्षणमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले.
कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे, मला आनंद आहे की भारत सरकारने महान सामाजिक न्यायाचे प्रतीक कर्पूरी ठाकूर जी यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते देखील अशा वेळी जेव्हा आपण त्यांची जन्मशताब्दी साजरी करत आहोत.
I am delighted that the Government of India has decided to confer the Bharat Ratna on the beacon of social justice, the great Jan Nayak Karpoori Thakur Ji and that too at a time when we are marking his birth centenary. This prestigious recognition is a testament to his enduring… pic.twitter.com/9fSJrZJPSP
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2024
कर्पूरी ठाकूर यांचे संसदीय जीवन सत्तेने भरलेले नव्हते. त्यांनी बहुतांश काळ विरोधी राजकारण केले. असे असूनही त्याची मुळे जनमानसात खोलवर होती. 1977 मध्ये त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली होती.