जळगाव;- शहरातील हनुमान नगर सिद्धिविनायक शाळेमागे राहणाऱ्या एका चाळीस वर्षे इसम घरात झालेल्या शाब्दिक भांडणातून रागाच्या भरात घरातून बेपत्ता झाल्याची घटना 12 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडले असून या प्रकरणी मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सुनील खंडू काकूलदे वय 40 हे सेंटरिंग कामाचा व्यवसाय करीत असून ते 12 रोजी दारू पिऊन आल्याने त्याच्या पत्नीने याचा जाब विचारला असता यात दोघांमध्ये शाब्दिक वाद होऊन सुनील काकुळदे हे दुपारी दोन वाजता घराबाहेर कोणालाही न सांगता निघून गेले. याबाबत त्यांचा मुलगा प्रथमेश सुनील काकूळदे याने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली असून तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील करीत आहे.