यावल ;- तालुक्यातील शिरसाड येथील 32 वर्षीय महिला ही किरकोळ कारणावरून दोन वर्षाच्या मुलीसह घरातून निघून गेली असल्याची तक्रार पतीने दिल्यावर यावल पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आले आहे .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शिरसाड तालुका यावल येथील रहिवासी रोहिदास अर्जुन पाटील वय 37 यांची पत्नी वैशाली रोहिदास पाटील वय 32 आणि मुलगी दुर्गा रोहिदास पाटील वय दोन वर्षे हे 11 जुलै रोजी सकाळी आठ वाजता किरकोळ कारणाचा वादाचा राग येऊन घरात कोणालाही न सांगता पत्नी वैशाली ही मुलगी दुर्ग हिच्यासह कुठेतरी निघून गेली . तिचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने रोहिदास पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आले आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सिकंदर तडवी करीत आहे.