क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
लाहोरमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशचे संघ एकमेकांशी भिडत आहेत. आशिया चषकाचे अनेक सामने पावसामुळे खंडित झाले आहेत. अशा स्थितीत आणखी एक बाब समोर आली आहे जी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. वास्तविक, पाकिस्तानच्या लाहोरमध्ये सामन्यादरम्यान विजेचे संकट आले होते. स्टेडियमचे दिवे गेले, त्यामुळे स्टेडियममध्ये अंधार झाला. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर लोकांनी पाकिस्तानला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
यजमान आणि बांगलादेश यांच्यातील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोर टप्प्यातील सामना सुमारे 20 मिनिटांसाठी फ्लडलाइटच्या बिघाडामुळे थांबल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) बुधवारी धक्का बसला. बांगलादेशचा संघ 38.4 षटकात 193 धावांवर गारद झाला. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने पाच षटकांत विकेट न गमावता १५ धावा केल्या होत्या, तेव्हा गद्दाफी स्टेडियमच्या फ्लडलाइट टॉवरचा प्रकाश गेला. दरम्यान वीज खंडित होण्याचे खरे कारण समजू शकले नाही, परंतु सुमारे 20 मिनिटे फ्लडलाइट बंद राहिला. यादरम्यान पाकिस्तानचे सलामीवीर इमाम-उल-हक आणि फखर जमान पंचांशी बोलताना दिसले. फ्लडलाइट्स पुन्हा सुरु झाल्यवर खेळाडूंनी मैदान गाठले आणि सामना सुरु झाला.